अहमदनगर दि.२२ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उड्डाण पुलाबाबत वेगवेगळ्या पटनांमुळे उड्डाणपूल चांगलाच चर्चेत आला आहे.उड्डाणपुलाला मुहूर्त लागल्यानंतर पहिल्याच दिवशी उड्डाण पुलावर झालेले भांडण त्यानंतर स्पीड ब्रेकर मुळे झालेला अपघात उड्डाण पुलावर गेलेल्या म्हशी आणि सेल्फी साठी आणि रील साठी तरुण-तरुणींनी केलेली गर्दी. या सर्वच प्रकारांमुळे उड्डाणपूल चांगला चर्चेत राहिला आहे.
आता या उड्डाण पुलाचा उपयोग वेगळ्याच प्रकारे झाल्याच समोर आले असून आज दुपारच्या सुमारास एका धूनस्टाईल मंगळसूत्र चोरणाऱ्याने अशोका हॉटेल समोर उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूस मंगळसूत्र हिसकावून उड्डाणपुलावरून भरदाव वेगाने पलायन केले त्यामुळे उड्डाणपुलाचा असाही उपयोग झाल्याचा चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे.