औरंगाबाद दि.१ ऑगस्ट-
“भाजपा नेत्यांवर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची कारवाई झाल्याचे, भाजपात गेलेल्यांची कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा आणि लाख रुपये मिळवा”, असं बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांच्यावतीनं हे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर अक्षय पाटील यांचा मोबाइल क्रमांक देखील देण्यात आला आहे. भाजपा नेत्यांवर किंवा भाजपात गेलेल्यांवर ईडी तसंच इतर केंद्रीय यंत्रणांकडून कारवाई केली जात नाही असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून औरंगाबादेत हे बॅनर लावण्यात आले आहेत.