Homeविशेषवक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या निषेधासाठी पंधरा मिनिटे बत्तीगुल आंदोलन ...नगर शहरात...

वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या निषेधासाठी पंधरा मिनिटे बत्तीगुल आंदोलन …नगर शहरात प्रतिसाद…

advertisement

अहिल्यानगर दिनांक 30 एप्रिल

एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या निषेधाबाबत मोठी घोषणा केली होती. मंगळवारी त्यांनी नागरिकांना आवाहन केले होते की, नवीन वक्फ कायद्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ३० एप्रिल रोजी दिवे बंद करून निषेध करणार आहे. बुधवारी रात्री ९ ते ९:१५ वाजेपर्यंत घरातील दुकानातील दिवे बंद ठेवून निषेधात सहभागी व्हावे, जेणेकरून आपण पंतप्रधान मोदींना संदेश देऊ शकू की हा कायदा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

या वाहनाला नगर शहरातही बऱ्यापैकी पप्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणचे दिवे नऊ ते सव्वानऊ दरम्यान बंद ठेवण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी फिरता बंदोबस्त तैनात केला होता.

शहरातील मुस्लिम बहुल भागात बरोबर नऊ वाजता लाईट बंद करण्यात आली होती तर सव्वा नऊ दरम्यान लाईट पुन्हा सुरू करून नागरिकांनी वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या निषेध व्यक्त केला.

मात्र अनेकांना याबाबत माहिती नसल्याने महावितरण कंपनीने लाईट झालेली काय अशी ही चर्चा शहरात सुरू होती.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular