अहमदनगर दि.८ जुलै
अहमदनगर शहराजवळील एमआयडीसी मोठे उद्योगधंदे नसल्याने बकाल होत चालली आहे. मोठं मोठे उद्योग नगर शहारत येण्याऐवजी सुपा रांजणगाव एमआयडीसी मध्ये जात आहेत . ज्या कंपन्या सध्या नगर शहारत आहेत त्यावरच छोट्या मोठ्या कंपन्या सुरू आहेत.
मात्र एमआयडीसी परिसरातील मोकळ्या भूखंडावर सध्या अतिक्रमण झाले असून मोठं मोठे भंगार गोडाऊन अस्तित्वात आले आहेत तर काही ठिकाणी खुलेआम बेकायदेशीर धंदे सुरू आहेत आणि इतर व्यावसायिक सुद्धा अतिक्रमण करून व्यावसाय करत आहेत. त्याला खतपाणी घालण्यासाठी गावगुंडांनी हप्ते वसुली सुरू केली आहे.
एमआयडीसीतील रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई कोण करणार महापालिकेकडून मनपाच्या हद्दीत कारवाई करण्यात येते. मात्र, एमआयडीसीच्या अखत्यारित येणाऱ्या जागेवर एमआयडीसीने कारवाई करायची असते. त्यामुळे या अनधिकृत वसुली पंटरची दुकानदारी जोरात सुरू आहे.
एमआयडीसी परिसरात नगर मनमाड रोड लागत अनेक ठिकाणी मोठमोठी अतिक्रमणे असून त्या ठिकाणी अनधिकृत पैसे वसुली केली जाते अनेक ठिकाणी परप्रांतीयांना ही दुकाने दिली आहेत त्यांच्याकडून दर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपयांच्या वसुली केली जाते