मुंबई दि.९ नोव्हेंबर
माझा शिंदे गटात प्रवेश होत आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले आहे. प्रवेशासंदर्भात कसं, काय, कधी ही चर्चा करण्यासाठी भेट होणार आहे. मला शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती स्वीकारेन. मला शिंदे यांनी राजकारणात आणले. म्हणून त्यांच्यासोबत जाते आहे. मातोश्रीवर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. मी शिंद-ठाकरे गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला, पण नाही आले म्हणून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे त्याच प्रसाद माध्यमांशी बोलताना शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी हे धक्कादायक वक्तव्य केल आहे.
दीपाली सय्यद यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. “मुंबई मनपातील खोके ‘मातोश्री’वर बंद होण्याची खंत रश्मी ठाकरेंना आहे. नीलम गोऱ्हे, सुषमा अंधारे चिल्लर आहेत, सगळ्याच्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत”, असा आरोप दीपाली सय्यद यांनी केला.