.अहमदनगर दि.१९ ऑक्टोबर
अहमदनगर महानगर पालिकेची आज बुधवारी सर्वसाधारण सभा झाली सभा सुरू झाली ती नगर शहरातील खड्ड्यांच्या प्रश्ना वरून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजाप,शिंदेगट शिवसेना नगरसेवकांनी रस्त्यावर असणाऱ्या खड्डयांवरून प्रशासनाला सुरुवातीला चांगलेच धरले होते. स्थायी समिती सभापती कुमार वाकळे,नगरसेवक डॉ.बोरुडे, प्रकाश भगानगरे,दिपाली बारस्कर,माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,नगरसेवक अशोक बडे, यांनी आपल्या प्रभागात झालेल्या रस्त्यांच्या दुर्दर्शे बद्दल मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना चांगलेच धारेवर धरले होते. बांधकाम विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सदस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या पाऊस चालू असल्याने शहराच्या रस्त्यांची दुदर्शा झाली असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला होता याबाबत काय झाले याबाबत नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्यात आला असून त्यांच्यामार्फत शहरातील काम होणार असल्याचं प्रशासनाने सांगितले. मात्र या निधी खाली होणाऱ्या रस्त्यांच्या मुळे या ठिकाणी महानगरपालिकेचा निधी वापरता येत नाही आणि निधी परत जातो त्यामुळे प्रभागात विकास कामांना अडचण होत असल्याचं नगरसेवक अविनाश घुले यांनी महापालिकेच्या प्रशासनास निदर्शनात आणून दिले.
तर शाहरतील गणपती विसर्जन आणि मोहरम मार्गावर पॅचिंग साठी किती खर्च करण्यात आला या अनिल शिंदे यांच्या प्रश्नावर शहरातील बोल्हेगाव ते शहर ते केडगाव पर्यंत पॅचिंग साठी 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती मनपा अभियंता सुरेश इथापे यांनी दिली मात्र एक कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा नगरसेवक अनिल शिंदे यांनी केला.
शाहरतील आमरधाम मध्ये ओटे आणि जाळ्या यांची दुरवस्था झाली असून अनेक वेळा अंतीमसंस्कार करताना मृतदेह पडतात अशी अवस्था झाली असल्याचे फोटोसह पुरावे नगरसेवक गणेश कवडे यांनी दिले. याबाबत दिवाळीनंतर नवीन ओटे आणि जाळी बसवण्याचे काम सुरू करण्यात येईल असे माहिती प्रशासनाने दिली.
सावेडी उपनगर मधील प्रोफेसर कॉलनी चौकात महानगरपालिकेचे कचरा संकलन केंद्र आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी पसरली असून या ठिकाणी असलेले गाळेधारक महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या मागे संपूर्ण कचरा आणून टाकतात त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे या ठिकाणचे कचरा संकलन बंद करा आणि याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या अन्यथा नागरिकांसह महानगरपालिका मोर्चा काढावा लागेल असा इशारा नगरसेवक भैय्या गंधे यांनी दिला
नगरपालिकेच्या सभेत नऊ विषय विषय पत्रिकेवर होते त्यामध्ये प्रामुख्याने नगर शहरातील नगर कल्याण रोडवरील शिवाजीनगर चे नामकरण छत्रपती शिवाजीनगर करणे, तसेच बुरुडगाव रोडवरील निलय निकेतन अपार्टमेंट चौकास जय मल्हार चौक नाव देणे, प्रभाग क्रमांक १४ मधील सारसनगर अंतर्गत बाकलीवाल कॉलनीला छत्रपती नगर नामकरण करणे, कल्याण रोडवरील खुली जागा शाळेच्या क्रीडांगणासाठी देणे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या मूळ व वाढीव हद्दीतील क्षेत्राचा भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे एकत्रित सुधारित विकास योजना तयार करण्यासाठी शासनामार्फत डीपी मागवणे इरादा जाहीर करणे व नगर रचना अधिकारी यांची नियुक्ती करणे.
असे विषय होते मात्र मध्यंतरी नगर शहराला पावसाने चांगले झोडपून काढले होते त्यामुळे डासांची उत्पत्ती जास्त होऊन शहरात ठिकठिकाणी डेंगू चे पेशंट वाढले आहेत. या प्रश्नावर सभागृहात केडगावचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना चांगलेच धारेवर धरले होते याच गदरोळात शेवटी वंदे मातरम होऊन सभा संपली