Home राजकारण महागाई बेरोजगारी कडे दुर्लक्ष करत काही विशिष्ट पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत...

महागाई बेरोजगारी कडे दुर्लक्ष करत काही विशिष्ट पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत त्यांना थोपवण्याचे काम आपल्याला करायचंय – प्रा. माणिक विधाते प्रभाग क्रमांक चार मध्ये पार पडली एक तास राष्ट्रवादी साठी बैठक

अहमदनगर दि.४ मे
अहमदनगर शहारत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबविला जात असून या माध्यमातून प्रत्येय प्रभागात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सोबत बैठक घेऊन चर्चा सत्र राबवण्यात येत आहे सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये शनिवारी एक तास राष्ट्रवादी साठी उपक्रम भाभिक माणिकराव विद्याते,अजिंक्य बोरकर, साधना ताई बोरुडे,अमित खामकर,अँड रविद शितोळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या चर्चा सत्रात महाविकास आघाडीच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजना तळा गळा पर्यंत पोहचवण्याचे काम तसेच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेले कामे आणि भविष्यात होणाऱ्या कामाबद्दल माहिती पोहचवणे आणि सध्याच्या काळात महाराष्ट्रात चालू असलेली परिस्थिती बाबत कार्यकर्त्यांनी जागरूक राहून खरी परिस्थिती सामन्य नागरिकांनपर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचा आवहान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते यांनी केलं आहे.

देशात सध्या जी परिस्थिती आहे त्या बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की पेट्रोल डिझेल भावा वरून केंद्र सरकार राजकारण करत आहे.महाराष्ट्र राज्याचे पैसे केंद्र सरकार कडे आहेत मात्र ते दिले जात नाही महागाई वाढली आहे त्यावर कोणाचे नियंत्रण नाही ज्या गरजा नको असतील त्या गरजा पूर्ण करण्याचे काम विशिष्ट लोक करत आहेत.नको त्या प्रश्ना वर राजकारण करून जनतेची दिशाभूल काही विशिष्ट पक्ष करत आहे त्यांच्या भूलथापांना बळी न पडता महाराष्ट्राचा विकास आणि शहराचा विकास कसा होईल या बाबीकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

शहराचा विकास आता सुरू झाला असून पुढील काळात शहराचा चेहरा मोहरा बदला जाईल कोविड काळात काम थांबले असल्याने आता ते सुरू झाले असून नागरकारांच्या सर्व अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करेल असेही त्यांनी शेवटी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version