मुंबई दि.४ जून
राज्यसभेची निवडणूक जवळ येत असून या निवडणुकीमध्ये आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भारतीय जनता पार्टी तर्फे धनंजय महाडिक हे राज्यसभेसाठी मैदानात उतरले आहेत. शेवटच्या दिवशी महाराष्ट्र विकास आघाडीने निवडणूक बिनविरोध बिनविरोध व्हावी यासाठी भाजप कडे प्रस्ताव ठेवला होता.मात्र भाजपने सहावी जागा लढवणारच या निर्णयावर ठाम राहिल्याने या निवडणुकीमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची पळवापळवी होऊ नये अथवा घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश मिळाले असून सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे