अहमदनगर दि.१३ ऑगस्ट
देशात सर्वत्र स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. दिल्ली ते गल्लीपर्यंत सर्वजण यावर्षीचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सज्ज होत आहे. तसेच केंद्र सरकारने यावर्षी हर घर झेंडा हा कार्यक्रम राबवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वच घटकांना सामावून घेण्याची नीती आखली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कोणीच मागे राहिलेले नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने हा स्वातंत्र्य दिन कशा पद्धतीने साजरा करायचा याची आखणी करत आहे.
अहमदनगर शहरातील पारिजातक चौक परिसरातील नागरिकांनी एकत्र येत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. या चौकातील सर्व कचरा ऍड. लक्ष्मीकांत पटारे, शिरीष जानवे,अभय खाबिया, विशाल साबळे यांनी स्वयंस्फूर्तीने साफ करत परिसर स्वच्छ केला आहे.
तर चौकातील महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या पुतळ्याभोवती स्वच्छता करून त्या ठिकाणी विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले . पुतळाची रंगरंगोटी तसेच पुतळाभोवतीच्या कुंपणाचे सुशोभीकरण हे नागरिक स्वतः करणारा असून 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी झेंडावंदनही करण्यात येणार असल्याची माहिती ऍड. लक्ष्मीकांत पटारे, शिरीष जानवे,अभय खाबिया, विशाल साबळे यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा साठीची तयारी सध्या आबालवृद्धांपासून,तरुण,विध्यार्थी करताना मग्न झाले आहेत.