अहमदनगर दि.८ मे
आमदार रवी राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संजय राऊत यांच्यावर चांगली तोफ डागली आहे. सध्याच्या सरकारने आम्हाला सत्तेचा गैरवापर करून चौदा दिवस तुरुंगात ठेवलं. तुरुंगामध्ये आम्हाला अत्यंत वाईट वागणूक मिळाली असून या सर्व प्रकरणाची तक्रार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे जाऊन करणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितला आहे.
अमरावतीच्या आमच्या घरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला मात्र त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत मात्र आम्ही हनुमान चालीसा म्हणायची मागणी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. नवनीत राणा यांचा तुरुंगामध्ये छळ केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.