अहं6 दि.२३ मे
गेल्या आठवडाभरापासून राज्यसभेच्या साहाव्या जागेचे वातावरण तापले आहे. यात छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी घोषित केली असून अनेक अपक्ष आमदारांनी यासाठी हमी भरली आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पक्ष काढलेल्या शिवसेनेने मात्र थेट छत्रपतींच्या वंशजांच्या बाबतीतच आडमुठी भूमिका घेतली आहे. २०१६ साली सुद्धा शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा क्रांती मोर्चाला हिणवले होते.आताही संजय राऊत बेताल वक्तव्य करून मराठा समाजाच्या भावना दुखत आहे. यामुळेच अहमदनगर जिल्ह्यातील उच्च शिक्षित तरुणांमध्ये असंतोषाचे वातावरण झाले आहे.
याबद्दल बोलताना स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल म्हणाले की संभाजीराजे यांच्यामुळे रायगडास गतवैभव मिळण्यास मदत होत आहे शिवसेनेला एक दगडही त्याठिकाणी बांधता आला नाही. संभाजीराजेंमुळे सारथी संस्था उदयास आली व मराठा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात शिष्यवृत्ती मिळाली. सोबतच अण्णासाहेब पाटील महामंडळामुळे मराठा तरुणांना व्यवसायासाठी कर्ज मिळाले त्यामुळे आम्ही सर्वजण छत्रपती संभाजीराजे ऋणी आहोत.सेनेने मात्र छत्रपतींच्या नावाचा वापर करून आतापर्यंत सत्ता मिळवली आहे. शिवसेनेने आज छत्रपतींना शिवबंधनाची अट घातली आहे, परंतु याच सेनेने पक्ष काढतांना छत्रपतींच्या वंशजांची संमती घेतली होती का ? तसेच सेनेचे मराठा आमदार यावर गप्प का? असे प्रश्न आम्हाला पडतात. राज्यसभेच्या निवडणुकीत जर सेनेने छत्रपतीशीं गद्दारी केली तर मात्र महाराष्ट्रभरात उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या असंतोषाला सेनेच्या आमदारांना तसेच मंत्र्यांना सामोरे जावे लागेल अशी भूमिका यशवंत तोडमल यांनी स्पष्ट केली.
या दरम्यान संघटनेचे खजिनदार रीनुल नागवडे यांनी माहिती दिली की आम्ही दोन दिवसांपासून राज्यभरातल्या उच्चशिक्षित तरुणांच्या संपर्कात आहोत व याची मोठी बैठक या दोन दिवसात घेणार आहोत शिवसेनेने किंवा इतर कुठल्याही पक्षाने आमच्या भावना दुखावू नयेत असे मत त्यांनी व्यक्त केले.