Home राजकारण कार्यकर्त्यांनो संयम महत्वाचा राज्यातील राजकीय उलथा पालथ होत असताना संयम राखूनच टीका...

कार्यकर्त्यांनो संयम महत्वाचा राज्यातील राजकीय उलथा पालथ होत असताना संयम राखूनच टीका टिप्पणी करा उद्या हेच नेते पवित्र होऊन स्वगृही येतील आणि तुम्ही एकमेकांचे डोके फोडून कोर्टवारी करत राहताल

अहमदनगर दि. २ जुलै
राज्यात सध्या राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर घडत असून शिवसेनेमधून बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आणि त्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांच्या आलेल्या तीव्र प्रतिक्रिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेले वाद हे पाहता एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की राज्यात याआधीही स्थानिक पातळीवर अनेक वेळा बंड झालेले आहेत.

थेट पक्षादेश डावलून स्थानिक पातळीवर आपल्याला सोयीचे राजकारण करताना अनेक मोठे राजकीय पुढारी या गोष्टी करत असतात याचा फायदा फक्त राजकीय पुढाऱ्यांचाच होतो आणि पदे उपभोगणाऱ्यांचा मात्र कार्यकर्ते मात्र एकमेकांशी भांडत बसतात आणि एकमेकांचे टाळकी फोडत कोर्टाच्या वाऱ्या करत बसतात हे तेवढेच सत्य आहे.

उदाहरण द्यायचे असेल अहमदनगर महानगरपालिकेत 2019 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी भाजपला रोखण्यासाठी राज्यपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना हे तीनही पक्ष अगदी टोकाची भूमिका घेऊन मैदानात उतरले होते. मात्र त्याच वेळेस अहमदनगर शहरामध्ये थेट भाजप राष्ट्रवादीची युती होऊन भाजपचे नगरसेवक कमी असतानाही शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपचा महापौर होण्याचा चमत्कार झाला होता. स्थानिक पातळीवर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांवर पक्षातून बडतर्फेची कारवाई करण्यात आली होती. मात्र काही दिवसानंतर सर्व अलबेल होऊन त्यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात आली आणि सर्व जण पावन करून घेऊन त्यांना राष्ट्रवादीत घेण्यात आले.

आणि अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि शिवसेनेचा महापौर केला. त्यामुळे राज्यात चाललेल्या या सत्तांतराचा घोळामध्ये कार्यकर्त्यांनी जास्त लक्ष न देता आणि आपल्याच माणसांवर टीका टिपणी न करता फक्त पाहत राहावे.

पुढारी हे आपल्या सोयीचे राजकारण करत असतात कालांतराने शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले आमदार पुन्हा चूक भूल माफ करत शिवसेनेत येऊ शकतात आणि त्यांना पावन करून पक्षातही घेतले जाऊ शकते त्यामुळे सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्ष असेल कार्यकर्त्यांनी संयम राखणे गरजेचे आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कधीही शत्रू नसतो वेळेनुसार राजकारण बदलत राहते त्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम राखणे हेच महत्त्वाचे आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version