अहमदनगर दि.३ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील उड्डाण पूल हा पूर्ण होत असताना त्याच्या उडघटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून आज जो तो उठतो आणि उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी करताना प्रसरमध्यामातून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतं आहे जसे काय उड्डाणपूल स्वखर्चाने खिशातून पैसे खर्च करून बांधलाय खरे पाहता उड्डाण पूल हा शहरातली प्रत्येक नागरिकांचे स्वप्न होते ते पूर्ण करण्यासाठीच स्वर्गवासी खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साथ देत नगरकरांचे स्वप्न पूर्णत्वास नेले आहे.
हे काम पूर्ण होत असताना त्यांच्याच पक्ष्याबरोबर ईतर पक्ष्यांच्या नेत्यांनी पुलाची पाहणी करताना खासदार दिलीप गांधी यांचे नाव कुठेच घेताना दिसत नाही त्यांच्या नावाचा विसर कुठेतरी पडताना दिसत आहे त्यामुळे नगरकरांना दिलीप गांधींनी बांधलेला पुल हे विसरता कामा नये. विरोधाला विरोध करण्याची माझी सवय नाही चांगल्या कामाची चांगल्या व्यक्तींची कामाची दखल घेणे व त्यांना हे त्या कामाचे श्रेय मिळणे हा माझा या माध्यमातुन प्रयत्न आहे. उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी पाहणी दौरे करणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांना नितीन भुतारे यांनी खडसावले आहे.