Home राजकारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उड्डाणपुलाचे उदघाटन उड्डाणपुलाच्या पूर्णत्वानंतर श्रेयवादाचे राजकारण चांगलेच...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उड्डाणपुलाचे उदघाटन उड्डाणपुलाच्या पूर्णत्वानंतर श्रेयवादाचे राजकारण चांगलेच पेटले

अहमदनगर दि.३ नोव्हेंबर

अहमदनगर शहराचा राजकारणाचा इतिहास हा खूप रंजक आहे नगरच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकलो नाही आणि ओळखू शकलो नाही असं अहमदनगर शहरातील राजकारण आहे. अहमदनगर शहरातील उड्डाणपूल हे नगरकरांचे एक दिव्य स्वप्न होतं मात्र हे स्वप्न बारा वर्षानंतर आता पूर्णत्वास जात आहे.

उड्डाणपूल सुरू करण्याच्या आधीही या उड्डाणपुलाचे तीन ते चार वेळा भूमिपूजन झाले होते. त्यानंतर अनेक वर्षानंतर उड्डाणपुलाच्या कामास लॉकडाऊन च्या दरम्यान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते नारळ वाढवून पायाभरणाची सुरुवात झाली होती. त्यानंतर उड्डाणपुलाच्या नावाबाबतही अनेक चर्चा घडल्या उड्डाणपूल जसा जसा पूर्णत्वास जात होता तसा तसा या उड्डाणपुलाचे कामाच्या श्रेयवादाच्या चर्चा सुरू झाल्या.

तत्कालीन भाजपचे खासदार दिलीप गांधी तत्कालीन आमदार अनिल राठोड तसेच नगर शहरातील काही समाजकार्य करणाऱ्या संघटना आणि या रोडवरून जाणाऱ्या नागरिकांच्या रेट्यामुळे अखेर हा उड्डाणपूल पूर्ण होत असून. 19 नोव्हेंबर रोजी हा पूल नागरिकांना वापरण्यासाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच सध्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली होती. यावेळी त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीमध्ये स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांच्या बद्दल एकही शब्द न काढल्यामुळे अहमदनगर शहर शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले होते. त्या दिवसापासून शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरुद्ध चांगलीच टीकेची मोहीम सुरू करण्यात आली होती.

आणि आज अखेर शिवसेनेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी उड्डाण पुलावर जाऊन या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम युवा सेना प्रमुख विक्रम राठोड नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक योगीराज गाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कोतवली पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी  त्या ठिकाणी त्यांना नारळ फोडण्यासाठी मज्जाव केला होता उरलेले नारळही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या सत्तेत सध्या अनेक घडामोडी झाल्या आहेत महाविकास आघाडी म्हणून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होते तर आता त्यांच्यामध्ये फुटून शिवसेनेचा एक गट बाहेर पडला आहे तो भाजपबरोबर असल्यामुळे येत्या 19 तारखेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी ते कार्यकर्ते त्यांच्यासोबत असणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून आणि ज्या कार्यकर्त्यांनी आंदोलने उपोषण केले आशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज या पुलाचा शुभारंभ करून हा फुल नागरिकांसाठी लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version