अहमदनगर दि.१५ नोव्हेंबर :
रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला मागील दोन वर्षांत तब्बल १०८ कोटी रुपयांचा निधी मिळाला. मात्र अधिकारी, पदाधिकारी आणि ठेकेदार संस्थांनी या कामांच्या निविदाप्रक्रियेत घोळ घातल्यामुळे रस्त्यांची कामे रखडली होती. सर्व अडथळे संपल्यानंतर यावर्षी पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने शहरातील सर्व कामे ठप्प होती त्यामुळे शहरात सध्या सर्वत्रच खड्ड्यात खड्डे दिसून येत आहेत.
मात्र आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रखडलेली रस्त्यांचे कामे सुरू झाली असून अहमदनगर शहरातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित गुलमोहर रोड रस्त्याच्या अर्धवट राहिलेल्या कामास आज पुन्हा सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रस्ता अतिक्रमणामुळे अरुंद झाल्या असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर स्वतः आमदार संग्राम जगताप यांनी या ठिकाणी भेट देऊन महानगरपालिकेचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता मोठा करून चांगल्या दर्जाचा करावा तसेच नागरिकांनीही महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे की जेणेकरून हा रस्ता चांगल्या पद्धतीने आणि दर्जेदार तयार होईल आणि गुलमोहर रोड ची ओळख एक चांगला रस्ता म्हणून होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचाही त्यांनी सांगितले आहे. पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणचे कामे थांबली होती आता ही कामे हळूहळू सुरू झाली असून लवकरच अहमदनगर शहर हे खड्डे मुक्त होईल असे यावेळी संग्राम जगताप यांनी सांगितले.
गुलमोहर रोडची पाहणी करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अमोल गाडे ,माजी नगरसेवक निखिल वारे ,नगरसेवक सुनील त्रंबके ,नगरसेवक प्रकाश भागानगरे सामाजिक कार्यकर्ते शिरीष जाणवे ,महेश घावटे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता सुरेश इथापे मनोज पारखे तसेच बांधकाम ठेकेदार मेहेर आदी उपस्थित होते.