अहमदनगर दि.३ नोव्हेंबर
शहरातील ठीक ठिकाणी दुकाना बाहेरील असलेली अतिक्रमणे रस्त्यावर लावली जाणारी वहाने आणि बेशिस्त वाहतूक आणि शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष या मुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे वाहतुकीची कोंडी हे फक्त शहराचे समस्या राहिली नसून आता ती उपनगरातही जाणवू लागली आहे. उपनगरात रात्रीच्या वेळी विविध चौकांमध्ये उभे असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यां भोवती होणारी बेशिस्त पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे नित्याचे झाले आहे मात्र याकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही.
अहमदनगर शहरात किती ठिकाणी वन वे वाहतुक आहे हे फक्त देवालाच माहीत असू शकते कारण कागदावर शहरातील मुख्य कापड बाजारातील एमजी रोडवर तेली खुंट चौकाच्या पुढील चौकापासून ते भिंगारवाला चौकापर्यंत वनवे आहे असे समजते मात्र या ठिकाणी शहर वाहतूक पोलीस कधीच उभा असलेला दिसत नाही असला तरी तो शेवटच्या टोकाला असतो म्हणजे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करून संपूर्ण कापड बाजार फिरून आल्यानंतर त्याला दंड करणे हा हेतू असावा का असा प्रश्न पडतो आहे.
अहमदनगर शहरातील प्रेमदान चौक या ठिकाणी सिग्नल सुरू असतो मात्र शहर वाहतूक शाखेचा कर्मचारी या ठिकाणी आतापर्यंत कधीच उभा राहिलेला दिसला नाही त्यामुळे नागरिक सिग्नल तोडून बिशिष्टपणे वाहतूक करत असतात त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेले आहे तोच प्रकार शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरही अनेक वेळा दिसून येतो शहरातील फक्त डीएसपी चौक या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचा पोलीस 12 महिने उभा असलेला आढळून येतो मात्र इतर ठिकाणी कधी मधीच कर्मचाऱ्यांचे दर्शन होत असते त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या ही वेळोवेळी समोर येते शहराप्रमाणेच आता सावडी उपनगर केडगाव उपनगर मोठ्या प्रमाणात वाढत असून या दोन्ही ठिकाणी मोठमोठे चौक तयार झाले आहेत आणि या ठिकाणी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्या भोवती होणारी बेशिस्त पार्किंग यामुळे रोजच वाहतूक कोंडी निर्माण होत असते मात्र सहनशील नगरकर वाजून वाजून आपापल्या पद्धतीने रस्ता काढतानाचा चित्र रोज पाहायला मिळते रात्रीच्या वेळी शेअर वाहतूक शाखेने किमान एक पोलीस गाडी अशा विविध चौकात फिरून कारवाई केली तर बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या लोकांना आळा बसेल आणि दंडही वसूल होऊ शकतो
नियंत्रणासाठी स्वखर्चाने दोन ट्राफिक वार्डन ठेवण्याची तयारी दाणाबाजार असोसिएशनने उपायुक्तांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दर्शविली आहे.
दाणाबाजारात अतिक्रमण निर्मुलन मोहीम घेण्यापूर्वी तेथील व्यापाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी महपालिकेत उपायुक्त प्रदीप जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची बैठक झाली. यात दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारीया व व्यापारी उपस्थित होते.
कापडबाजारात पार्किंग मुळे होणारे अतिक्रमण आहेच आणि वाहतूक शाखेच्या दुर्लक्षामुळे येतील वनवे ची अंमलबजावणी होत नाही. बेशिस्त वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे किमान आता भविष्यात तरी या ठिकाणी वनवे अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे.
शहारत ठीक ठिकाणी अनेक वर्षा पासून चारचाकी गाड्या रोडवरच उभ्या केलेल्या आहेत त्या हटवण्या बाबत कारवाई होणे गरजेचे आहे. चारचाकी दुरुस्तीच्या नावा खाली रस्त्यावरच गॅरेज टाकून गाड्या दुरुस्ती केल्या जातात आशा गाड्याबाबत कारवाई होणे गरजेचे आहे मात्र ती होताना दिसत नाही.
शरद वाहतूक शाखेचा धाक कुठे दिसून येत नाही कारण ट्रिपल सीट, मोठमोठ्याने विचित्र हॉर्न वाजवणे तसेच गाडीवर मोबाईलवर बोलत जाणे,शालेय ,कॉलेज युवक गाडी घेऊन बेशिस्तपणे वाहन चालवत असतानाही कोणतीही कारवाई नाही आणि शहरातील रिक्षावाले आणि पियागो यांना तर कोणाचा धाक राहिलेला दिसत नाही. कारण शहरातून एकाच रिक्षात आठ आठ दहा प्रवासी भरून जाणाऱ्या रिक्षा रोजच दिसत आहेत आणि कुठेही मागेपुढे न पाहता रीक्षा रोड मध्येच थांबवणे हा तर त्यांचा कायमचा फंडा आहे. त्यामुळे अनेक वेळा अपघात होतात मात्र या बेशिस्त रिक्षा चालकांवर कोणाचाही धाक नसल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसून येत आहे. माळीवाडा बस स्थानकासमोरच रोजच चित्र याची प्रचिती देते की रिक्षावाले कोणालाही घाबरत नाही या ठिकाणी एसटी स्टँड मध्ये जाणाऱ्या बसच्या समोरच रिक्षा आडवी लावून पाच ते दहा मिनिटे हे रिक्षा चालक पॅसेंजर आल्याशिवाय हलत नाही त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याचे झाली आहे.
नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडूनही नागरकरांना हीच अपेक्षा आहे की अवैद्य हातभट्टी दारू पकडण्याची मोहीम सध्या शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचप्रमाणे आता शहरातील वाहतुकी संदर्भात एकदा लक्ष घालून शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून सोडवण्यासाठी एक मोहीम राबवून त्यात सातत्य कसे राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरातील चौपाटी कारंजा, दिल्ली गेट नेप्ती नाका माळीवाडा वेस उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक या ठिकाणी रात्रीच्या वेळेस वाहन चालवणे म्हणजे एक कठीण परीक्षा असते या ठिकाणी रात्री शहर वाहतूक पोलिसांनी चक्कर मारणे गरजेचे आहे जेणेकरून नागरिकांना शिस्त लागेल आणि वाहतूक कोंडी टाळू शकेल