अहमदनगर दि.२९ डिसेंबर
कोरोनाचे करण देवून लग्न समारंभात जी कारवाई होतेय ती योग्य नसून चुकीची आहे लग्न समारंभात कोणावरही कारवाई करू नका आशा दंडात्मक कारवाई मुळे भ्रष्टाचाराचे रॅकेट निर्माण होत असल्याचे स्फोटक वक्तव्य भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. लोक आता घरात बसायला तयार नाहीत आपण किती वेळा बंद लॉक डाऊन करणार आहात ही तरुणाईची मागणी आहे मात्र बाहेर पडताना नागरिकांनी कोरोनाचे काही नियम पाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले आहे. लग्न समारंभात सामान्य माणसावर कारवाई होत असेल तर नेत्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे आणि जर नेत्यांवर कारवाई होत नसेल तर सामान्य नागरिकांवर कारवाई करू नका अशी विनंतीही त्यांनी शासनाला केली आहे.