Home राजकारण त्यांना सांगा मी विमानतळावर जिवंत परत आलो आहे पंतप्रधान मोदींचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना...

त्यांना सांगा मी विमानतळावर जिवंत परत आलो आहे पंतप्रधान मोदींचा पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना निरोप…

फिरोजपुर दि.५ जानेवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत आज मोठी चूक झाली असून पंजाबमधील फिरोजपूरमध्ये त्यांची मोठी रॅली होणार होती. त्यासाठी पंतप्रधान मोदी फिरोजपुर मध्ये पोहचले होते मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलना मुळे पंतप्रधानांची सभा रद्द करावी लागली. ANI च्या माहिती नुसार पी.एम मोदी या घटनेने प्रचंड संतापले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे आभार मानत मी जिवंत विमानतळावर परतलो आहे.पीएम मोदी भटिंडा विमानतळावर परतत असताना त्यांनी अधिकाऱ्यांना हा संदेश दिला. असे सांगण्यात येत आहे. त्यांनी सीएम चन्नी यांच्यावर निशाणा साधला होता.

पंजाबमध्ये भाजपचा निवडणूक प्रचार सुरू होणार होता मात्र मोजक्या आंदोलकांमुळेच पी.एम मोदींची सभाच रद्द करावी लागली.आता गृह मंत्रालयानेही पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली असून पंजाब सरकारकडून या बाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.

वास्तविक, पीएम मोदी भटिंडा येथे पोहोचले होते. येथून
हुसैनीवाला येथे हेलिकॉप्टरने राष्ट्रीय शहीद स्मारकापर्यंत जायचे होते. पण खराब प्रकाश आणि पावसामुळे 20 मिनिटे पीएम मोदींना प्रतीक्षेत ठेवण्यात आले मात्र हवामानात सुधारणा होत नसल्याने पंतप्रधान रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाणार होते. या मार्गाने 2 तास वेळ लागणार होता. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेच्या पुष्टीनंतर त्यांचा ताफा निघाला होता.

मात्र मध्येच काही आंदोलकांनी रास्तारोको केल्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा ताफा उड्डाण पुलाववरवर काही काळ अडकला होता. याबाबत पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून याबाबत महाराष्ट्रातील भाजपच्या वतीने पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version