अहमदनगर दि.३ फेब्रुवारी
अहमदनगर वरून हजारो नागरिक रोज पुण्याला ये जा करत असतात नगर आणि पुणे हे रस्त्याने अंतर 120 किलोमीटर असल्याने आणि त्यानंतर पुणे शहरात गेल्यानंतर तेथे लागणारा वेळ या सर्वांचे गणित पाहिले असता पैसे आणि वेळ यांची झळ बसते त्यामुळे नगर पुणे शटल रेल्वे सुरू केली तर नगर शहरासह विदर्भ आणि मराठवाडा येथून पुणे येथे जाणाऱ्या नागरिकांची सोय होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर नगर-पुणे रेल्वेसेवा सुरू करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने अहमदनगर स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर यांना देण्यात आले.
नगर शहर शिवसेनेच्यावतीने माजी महापौर भगवान फुलसादर यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन प्रबंधक
नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन नगर पुणे शटल रेल्वे सेवा किती गरजेची आहे तसेच नगर शहरा सह विदर्भ मराठवाडा येथिल नागरिकांना याचा कसा फायदा होईल या बाबत चर्चा करण्यात आली या वेळी महानगर पालिकेच्या महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, दत्ता जाधव, दत्ता काबरे, योगीराज गाडे, गिरिष जाधव, अमोल येवले. प्रशांत गायकवाड, काका शेळके, संग्राम कोतकर, दिपक खरे, परेश लोखंडे, जालिंदर वाप,सुरेश क्षीरसागर, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, गौरण ढोणे. पप्पू भाले, प्रमोद दुबे, आंबादास शिंदे. अरुण झेंडे, अरुणा गोयल यांच्यासह मनसे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
नगर पुणे रेल्वे सुरू झाली तर नगर मधील नागरिक विध्यर्थी दीड तासात पुण्याला पोहोचू शकतील आणि आपल्या घरी राहूनच विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करू शकतील. थेट रेल्वेमार्गाअभावी नगरमधील प्रवाशांच्या खिशाला झळ बसत आहे. हा त्रास वाचविण्यासाठी थेट रेल्वे हाच एक पर्याय आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शिवसेना युवा सेनेच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.