Home राजकारण नबाब मलिक यांच्या अटके नंतर क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलेलं ट्विट केलेलं...

नबाब मलिक यांच्या अटके नंतर क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलेलं ट्विट केलेलं ते गाणं चांगलं चर्चेत

मुंबई दि २४ फेब्रुवारी
राष्ट्रवादीचे मंत्री नबाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून सोशल मीडियासह मुंबईतील कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी या अटकेचं समर्थन केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे समीर वानखेडे प्रकरणात मलिक यांनी सातत्याने वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी, समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीही मीडियासमोर येऊन मलिक यांच्यावर टीका केली होती.

आज, मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्याची बातमी माध्यमांत झळकल्यानंतर क्रांती रेडकर यांनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी तानाजी चित्रपटातील जय माय भवानी हे गाणं हिट करून आपका दिन शुभ रहे असं लिहिलं आहे त्या नेटवर्क अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून काही मालिकांच्या बाजूने तर काही क्रांती रेडकर यांच्या बाजूनी आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version