अहमदनगर दि २५ डिसेंबर
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणुकीच्या गुलालाचा धुराळा अद्याप शांत झालेला नाही. निवडणुकीची सुरुवातच मोठ्या धक्क्याने झाली होती.नमनालाच महाविकास आघडी असल्याचे जाहीर करत शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आणि त्याच दिवशी या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला डावलून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी महाविकास आघाडी नाव देऊन उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर प्रचार पत्रका वरून काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब होणे प्रचाराला काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना न बोलणे अशा अनेक घटना घडल्या नंतर या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेसने महाविकास आघाडीचा उमेदवार कसा पडला याबाबत प्रश्नचिन्ह उभे करत शिवसेनेच्या काही नेत्यांवर टीका केली होती. तेच काँग्रेस नेते थेट शिवालय येथे जाऊन युवा सेनेचे अध्यक्ष विक्रम राठोड यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
या पत्रा बाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. मात्र या भेटीनंतर अनेक चर्चा नगर शहरात घडू लागल्या आहेत. कारण तथाकथित महाविकास आघाडीच्या पराभवानंतर काही शिवसैनिकांनी सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या आणि या पोस्ट चांगल्याच बोलक्या होत्या. स्वर्गीय अनिलभैय्या राठोड यांची उणीव निवडणुकीत अनेक जुन्या शिवसैनिकांना जाणवली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी पोस्ट व्हायरल केल्या आहेत.
तर काँग्रेस नेते युवा सेने चे अध्यक्ष विक्रम राठोड यांच्या भेटीनंतर थेट महाविकास आघाडी कडून उभे असलेले आणि पराभूत झालेले उमेदवार सुरेश तिवारी यांच्या भेटीस गेल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत झाल्याने याचा सर्वात मोठा तोटा शिवसेनेचा झाला आहे त्यामुळे शिवसेनेत अनेक जुने शिवसैनिक अस्वस्थ असून त्यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे.
हक्काच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव होणे ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे शिवसैनिकांना वाटत आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.राष्ट्रवादीने शिवसेना संपवायची सुपारी घेतली का? या पोस्ट वरूनच शिवसैनिकांच्या भावना समोर येत आहेत.