पंढरपूर दि ११ फेब्रुवारी
वीज वितरण कंपनीत सहायक अभियंता पदावर कार्यरत असणाऱ्या गणेश वगरे यांनी काही लोकांच्या नवे एक चिठ्ठी लिहून मोबाईल बंद करून पत्नी व दोन मुलींसह
आत्महत्या करीत असल्याचे पत्र लिहले होते या मुळे एकच खळबळ उडाली होती. काही लोक आपल्याला नाहक बदनाम करून पैशाची मागणी करत आहेत आणि मानसिक त्रास देत असल्याची माहिती या पत्रातून पुढे आली होती.
काही दिवस वगरे कुटुंब बेपत्ता असल्याने पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून वगरे कुटुंबियांना कर्नाटक मधील एका गावातुन सापडून पुन्हा त्यांना पंढरपूर मध्ये आणले होते.
या प्रकरणी गणेश वगरे यांनी दिलेल्या माहिती मधून धक्कादायक प्रकार समोर आला असून एक सामाजिक कार्यकर्ता आणि दोन पत्रकारांनी वगरे यांना बदनामी करणाऱ्या बातम्या छापण्याची धमकी देवून खंडणी मागितली होती त्यामुळे वगरे मानसिक तणावात होते. अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी तातडीने तापस करून केलेल्या समुउपदेशना मुळे त्यांनी हा विचार सोडून दिला.
तसेच गणेश वगरे यांच्या फिर्यादी वरून आता खंडणी मागितल्या प्रकरणी दोन पत्रकारांसह एका सामाजिक कार्यकत्यांवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजकाल अनेक लोक खोट्या पत्रकारितेची झूल अंगावर पांघरून असे चुकीचे उद्योग करत असल्याने जे पत्रकार खरेच न्याय देण्याचे काम करत आहेत अशा पत्रकारांची समाजात बदनामी होत चालली आहे.
असे अनेक तोतया पत्रकार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भलतेच उद्योग करतात त्या प्रकरणी गुन्हे दाखल होतो मात्र आता ज्याप्रकारे पत्रकारांवर हल्ला करण्याबाबत वेगळा कायदा करण्याच्या मागणी बरोबर आता तोतया पत्रकारांवर सुद्धा काहीतरी कडक कारवाई करावी यासाठी पत्रकार संघटनांनी मैदानात उतरायला हवे अन्यथा काम करणाऱ्या पत्रकारांना नेहमीच नाहक बदनामी ला समोर जावे लागते.