अहमदनगर दि१ फेब्रुवारी
विविध गुन्ह्यातील आरोपी मिळत नसल्याने न्यायालयाने अहमदनगर जिल्ह्यातील ४५ फरार आरोपींचे जाहिरनामे प्रसिध्द करुन, त्यांना फरार घोषित केले होते.तर न्यायालयात हजर न राहिल्यामुळे १६८ आरोपी विरुध्द तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे शिक्षा झालेले परंतु फरार असलेल्या आरोपी विरुध्द स्टॅण्डींग वॉरंट काढण्यात आले होते.
या बाबत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातील फरार आरोपी व स्टॅण्डींग वॉरंट बजावणी बाबतचा आढावा घेवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जास्तीत जास्त फरार आरोपींना अटक करणे व स्टॅडींग वॉरंटची बजावणी करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरी अशा शरीराविरुध्द व मालाविरुध्द गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यातील मागील २० वर्षापासुन फरार असलेले आरोपींना अटक करणे व स्टॅण्डींग वॉरंटची बजावणी करणेबाबत मागदर्शन करुन, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे नावानिशी फरार आरोपी व स्टॅण्डींग वॉरट मधील आरोपींची यादी तयार करुन अठरा जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधी करीता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
विशेष मोहिमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वीस वर्षा पासून फरार असलेले वीस आरोपी तर स्टॅण्डींग वॉरंट मधील ५१, पोटगी वॉरंट मधील असे एकुण ६८ आरोपी अटक करण्याची कारवाई केली आहे.
या विशेष कामगिरी बद्दल पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बक्षीस जाहीर केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखे कडून विशेष मोहिमेचे आयोजन करुन प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोपी पकडण्यात आले आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,मनोज पाटील,अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर , यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.