Home क्राईम पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्ये नंतर पडला ऑडिओ बॉम्ब… एका माजी...

पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्ये नंतर पडला ऑडिओ बॉम्ब… एका माजी पोलीस कर्मचाऱ्याने केली सर्व पोलखोल

अहमदनगर दि.२ ऑक्टोबर

राहुरी येथील मुळा डॅम धरणावर गार्ड नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी सर्व्हिस रायफल मधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना एक ऑक्टोबर रोजी घडली या घटने नंतर सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुरी येथे धाव घेतली होती. भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या केली याचे कारण आता समोर आले असून त्यांनी लिहिलेली सुसाईड नोट चांगलीच व्हायरल झाली आहे. राहुरी पोलीस स्टेशन मध्ये प्रेमकुमार भाउसाहेब आघाव यांच्या फिर्यादी वरून राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नरेंद्र साबळे,सहह्याक फौजदार प्रकाश निमसे, मपोकॉ राउत सर्व नेमणुक राजुर पोलीस स्टेशन ता अकोले तसेच शिवाजी फुंदे नेम- पोलीस मुख्यालय अहमदनगर यांच्या विरोधात भादवि कलम 306,385,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेच्या काही तासानंतरच पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांचे मित्र आणि पोलीस दलातून नुकतेच निवृत्त झालेल्या माजी पोलीस हवालदार रामकृष्ण लोंढे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये लोंढे यांनी पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी सविस्तर माहिती दिली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीसच किती त्रास देऊ शकतात याची धक्कादायक माहिती या ऑडिओ क्लिप मध्ये देण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये दिलेल्या सर्व गोष्टींची अधिकृत माहिती आणि कागदपत्रे त्यांच्याजवळ असल्याचं लोंढे सांगत आहेत. विनाकारण या प्रकरणात गोवून भाऊसाहेब आघाव यांना प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. तसेच एकाच वेळेस एकाच गुन्ह्या प्रकरणी दोन विभागीय चौकशी सुरू असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट लोंढे यांनी आपल्या क्लिपमध्ये केला आहे.

भाऊसाहेब आघाव यांना माहितीच्या अधिकारात माहिती न देणे त्यांचे वरिष्ठांसाठी दिलेले निवेदने दाबून ठेवणे असे प्रकार या प्रकरणातील फुंदे हे करत असल्याचं लोंढे यांनी क्लिप मध्ये सांगण्यात आले आहे. जवळपास 24 मिनिटे 59 सेकंद ही ऑडिओ क्लिप असून या 24 मिनिटात पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला कसे गुंतवण्यात आले आणि त्याचा अखेर मृत्यू कसा झाला याचे सविस्तर माहिती लोंढे यांनी दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व माहिती देऊनही त्यांनी कारवाई का केली नाही वरिष्ठांनी याकडे लक्ष दिले असते तर नक्कीच भाऊसाहेब आघाव यांचा जीव वाचू शकला असता. किमान आता तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून चौकशी करून यातील दोषी लोकांना बडतर्फ करावे अन्यथा अशी लागलेली कीड भविष्यात पोलीस दलाला पोखरू शकते. पोलीस दल हे शिस्तीचे खाते आहे आणि या शिस्तीच्या खात्यात अशा काही घटना घडल्या तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल उठू शकतो त्यामुळे या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि पोलीस खातं हे सर्वांसाठी सारखेच न्याय देणारे आहे हे जनतेला दाखवून द्यावं.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version