Home Uncategorized औरंगबादचे नामांतर झाले तर हे मत कशाच्या मुद्दयावर मागणार ,तर शरद पवारांना...

औरंगबादचे नामांतर झाले तर हे मत कशाच्या मुद्दयावर मागणार ,तर शरद पवारांना औरंग्या हा सुफी संत वाटतो का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवारांना चांगलंच सुनावलं

पुणे दि.२२ मे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच सभाग्रहात धडाडली प्रामुख्याने त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. तसेच आयोध्या दौरा जे राजकारण चालू आहे त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं.

बिहारमध्ये माफी मागण्याचे इतक्या वर्षांनी कशी जाग आली असा सवाल राज ठाकरे यांनी करत माफी मागायला लावणारे गेली 15 वर्ष गप्प का बसले होते असा प्रश्नही त्यांनी विचारला.२०१७ मध्ये गुजरातमधून दहा ते पंधरा हजार परप्रांतीयांना हाकलले मग त्या ठिकाणी कोणाला माफी मागायला लावणार. असे सांगत मुंबई मधील आंदोलन हे रेल्वेच्या भरती साठी आलेल्या परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्रतल्या लोकांना शिवीगाळ झाल्यानं तेव्हाच परप्रांतीय विरोधातील आंदोलन सुरू झालं होत ते उकरून काढून आता त्याचा राजकारण केले जात असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

मनसे आंदोलन करतात आणि अर्धवट सोडून देतात अशी टीका नेहमी केली जाते मात्र त्यांनी यावर भाष्य करताना राज्यातले टोलनाके आणि रेल्वे भरती प्रक्रिया याबाबत सविस्तर सांगितलं मनसे मुळेच आज मराठी लोक रेल्वे मध्ये भरती होत आहेत हे आमच्या आंदोलनाचे यश आहे तर राज्यातील 70 % टोल नाके आमच्या आंदोलनामुळे बंद झाले असेही त्यांनी सांगितले.

राणा दाम्पत्यांनी  केलेल्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी सांगितलं की मातोश्री मज्जित आहे का ? त्याच्यासमोर जाऊन तुम्ही हनुमान चालीसा म्हणतात त्यानंतर बरंच रामायण झालं राणा दाम्पत्य जेलमध्ये गेले.राणा सेना एकमेकांविरोधात वाटेल ते बोलले गेले हे सर्व झाल्यानंतर लडाखमध्ये राणा दांपत्य आणि संजय राऊत एकत्र एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढतात सेना आणि राणा मध्ये एवढं रामायण झालं तरी यांना लडाख मध्ये फोटो काढायला काहीच कसं वाटलं नाही का यांचं हिंदुत्व ढोंगी आहे अशी टीकाही त्यांनी केली.

हिंदुत्व म्हणजे वॉशिंग पावडर आहे ते विकत फिरताना दिसत आहे खरे हिंदुत्व आणि खोटे हिंदुत्व असं सांगत ते लोक फिरत आहेत. मुंबई मध्ये पाकिस्तानी कलावंत येत होते मात्र त्यांना या देशांमधून आम्ही हाकलून दिलं तेव्हा कुठे होते हिंदुत्वाची पाठराखण करणारे. रजा अकादमीच्या आंदोलनाच्या विरोधात फक्त मनसेने मोर्चा काढला होता बाकी कोणी नाही काढला हे तुमचं हिंदुत्व होत असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला तुमच्या अंगावर एक तरी आंदोलनाची केस असेल तर दाखवा अस आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केलं.

औरंगाबादच्या नामांतर वरून बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला मुख्यमंत्री भाषणात सांगतात की औरंगबाद चे नाव संभाजीनगर झालेय  मी म्हणतोय ना अरे मग तुम्ही कोण तुम्ही सरदार वल्लभाई पटेल की महात्मा गांधी आहात का? मी म्हणतोय म्हणजे नामांतर झालेय . औरंगाबाद शहरातल्या समस्यांचा विचार कोणी करत नाही औरंगाबाद नामांतरावर यूटर्न घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न जिवंत ठेवायचा आहे कारण या प्रश्नावर त्यांना पुढचे राजकारण करायचं आहे आणि मते मागायची आहेत.

शिवसेनेच्या राजकारणामुळे निजामाच्या अवलादी वळवळ करू लागल्या असून औरंगाबाद मध्ये एम आय एम चा खासदार झाला शिवसेनेचा उमेदवार पडला या एम आय एमच्या औलादी औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होतात आणि शरद पवारांना औरंग्या हा सुफी संत वाटतो का? असा सवाल त्यांनी केला. शरद पवार बाळासाहेब ठाकरे यांची विश्वासार्हता घालवत आहेत आणि त्याचा शिवसेनेला काहीच वाटत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version