अहमदनगर दि.१७ नोव्हेंबर
अहमदनगर न्यू आष्टी डेमुचे आज अतिरिक्त रेल्वे सेवेला रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या शुभहस्ते आणि खा.सुजय विखे पाटील ,खा.प्रीतम मुंडे,आमदार बबनराव पाचपुते ,आमदार सुरेश धस,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले रेल्वे अधिकारी अलोक सिंग नीरज दोहरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी बोलताना खा.सुजय विखे पाटील यांनी सांगितले की कै. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नपूर्ती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आष्टी ते नगर या रेल्वेची सुरुवात साधारण महिन्यापूर्वी या ठिकाणी आष्टी रेल्वे स्टेशन मधून झाली आणि परत एकदा या रेल्वेची दुसरी सुरुवात नगर मधून रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होत आहे मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने या रेल्वेच्या माध्यमातून मराठवाडा आणि नगर जिल्ह्यामध्ये एक कनेक्शन तयार झालेले आहे तशीच नगर ते पुणे इंटरसिटी पुढच्या सहा महिन्यांमध्ये रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून आपण पूर्ण ताकत लावून या सहा महिन्यांमध्ये आपल्याला नगर ते पुन्हा इंटरसिटी चालू करून दाखवू आणि या माध्यमातून नगरच्या नागरिकांना या नगर जिल्ह्याच्या नागरिकांना युवकांना रोजगार च्या माध्यमातून पुण्याला देखील कमीत कमी वेळामध्ये जाता येईल आणि परत येऊन आपल्या घरामध्ये राहून आपल्या आई-वडिलांची देखील काळजी घेता येईल अशा संकल्पनेतून या नगर पुन्हा इंटरसिटी ची सुरुवात आपण सहा महिन्यांमध्ये करू अशी ग्वाही मी या ठिकाणी नागरिकांना देतो असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
खा.प्रीतम मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगियले की नगर जिल्ह्याच्या दृष्टीने या रेल्वेचा काय महत्त्व आहे हे सांगणं कदाचित मला जमणार नाही पण बीड जिल्ह्याच्या दृष्टीने ही रेल्वे अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय जिव्हाळ्याची आहे रेल्वेच्या अवतीभवती मुंडे साहेबांची पुण्याई आहे आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची आशीर्वाद आहेत पंतप्रधान मोदी यांनी मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रगती पोर्टल वर या रेल्वेचा प्रकल्प घेऊन या रेल्वेला एक रक्कमी 2800 कोटी या रेल्वेचे प्रकल्पाची सुरुवातीला किंमत होती ती आता चारशे कोटी च्या घरात गेलेली आहे पण ही रक्कम मंजूर करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले रेल्वेचे आष्टी वरून रेल्वे नगरला येऊन फारसा बीड जिल्ह्याच्या दृष्टीने त्याचा फायदा झाला नसता ही रेल्वे जर पुढे पुणे किंवा मुंबईपर्यंत गेली तर बीड जिल्ह्याला निश्चित असल्याचा फायदा होईल आणि ही मागणी आम्ही तुमच्यासमोर करतो आहे आणि ती लवकर मान्य करावी अशी विनंती त्यांनी रावसाहेब दानवे यांना केली.
बीड जिल्ह्यात रेल्वे जावी ही अनेक वर्ष ही मागणी करून सुद्धा या ठिकाणी हा मार्ग मंजूर होऊ शकला नाही परंतु राज्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथरा मुंडे जेव्हा खासदार झाले तेव्हा मी पण खासदार होतो त्या टायमाला संसदेमध्ये आम्ही हा विषय सर्वांनी लावून धरला की मराठवाड्यामध्ये जवळपास सगळ्या जिल्ह्यांना रेल्वे होती परंतु बीड जिल्ह्याला रेल्वे नव्हती तेव्हा ही रेल्वे मंजूर करावी असा आग्रह त्या वेळी प्रामुख्याने मुंडे यांनी धरला आणि त्याला आम्ही पाठिंबा दिला आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की त्या काळामध्ये या रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली 66 किलोमीटरचा हा भाग आणि साधारणतः डिसेंबर 23 सप्टेंबरला सुरू केला परंतु जनतेतून मागणी होती की रेल्वे एकच असल्यामुळे आम्हाला मुंबईला जायचं असलं तर आम्हाला रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाहीये या टायमाला डेमो सर्विस जातील त्या टायमाला मुंबईला कनेक्टिव्हिटी नाहीये आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही अंदाज घेतला प्रीतम ताईने सुद्धा त्या काळामध्ये आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आत्ताची आम्ही रेल्वे या ठिकाणाहून सुरु करतोय आणि नगरकरांनी सुद्धा रेल्वे मुंबईपर्यंत गेली तर तसा फायदा आम्हाला नक्कीच मिळेल अशी आपली सगळ्यांची मागणी आहे पण ही जी आता रेल्वेचा मार्ग चालला आहे मी आपला सांगू शकतो इच्छितो की डिसेंबर 23 पर्यंत ही रेल्वे आम्ही बीड पर्यंत हा मार्ग पुरा करणारे अनेक डिसेंबर 23 ला बीड पासून तर नगर आणि नगर पासून तर मुंबई पर्यंत आणि रेल्वेची सरळ सेवा आपल्याला या भागातल्या जनतेला देणार आहे