Homeशहरआजी माजी आमदारांची घरे दिले पेटवून गाड्याही जाळल्या... आंदोलन पेटले सरकारला कधी...

आजी माजी आमदारांची घरे दिले पेटवून गाड्याही जाळल्या… आंदोलन पेटले सरकारला कधी जाग येणार

advertisement

अहमदनगर दि.३० ऑक्टोबर

ओबीसी मधून मराठा आरक्षण मिळावे या मागणी करता आता राज्यभर आंदोलन पेटले असून मराठा समाजाने ठिकठिकाणी मोर्चे आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले असून बीड जिल्ह्यात आंदोलनाने चांगलाच पेट घेतला आहे
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय आणि त्या पाठोपाठ आता घर जाळण्यात आले आहे तसेच घरासमोर लावलेल्या गाड्याही आंदोलकांनी पेटून दिल्या आहेत.

बीडमध्ये राष्ट्रवादी भवन फोडल्या नंतर आता शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. त्या पाठोपात आता क्षीरसागर कुटुंब ज्या ठिकाणी राहते त्या घरालाही आग लावण्यात आली आहे. घरासमोरील गाड्याही आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत पोलीस घटनास्थळी पोचले असून आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब आगीचा स्थळी पोहचले आहेत.

हळूहळू महाराष्ट्र पेटू लागला असून सरकारला हे आंदोलन झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याच्या पहिल्याच दिवशी दिला होता त्याचा प्रत्यय आता दिसून येत असून हे आंदोलन आता चांगलेच पेटले आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल असेच काहीसे चित्र सध्या दिसून येतेय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular