अहमदनगर दि.४ नोव्हेंबर
शहरातील आणि उपनगरामधील सर्वच रस्त्यांची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावरून चालणे म्हणजे नरकयातना भोगणे अशी अवस्था झाली असून या बाबत नागरिक रोजच संताप व्यक्त करत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या लाल फितीच्या कारभारामुळे सर्व कामे ठप्प झाले आहेत.
नागरिक नगरसेवकांना आणि लोकप्रतिनिधींना अक्षरशः शिव्यांची लाखोली घालत असल्यामुळे आता नगरसेवक ही संतप्त झाले आहेत आज शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी महानगरपालिकेच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी बोल्हेगाव परिसरातील नगरसेवक मदन आढाव चांगलेच आक्रमक झाले होते. नागरिक आता आम्हाला शिव्यांची लाखोली घालत असल्यामुळे आम्ही या पदाचा मोठेपणा का मिळवावा असा सवाल त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना केला. राजकारण करून लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा एखाद्या व्यवसायाकडून सुखी जीवन जगावे असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले दोन दिवसात बोल्हेगाव परिसरातील रस्त्याचे काम मार्गी नाही लागल्यास आपला राजीनामा सादर करणार असल्याचे मदन आढाव यांनी यावेळी सांगितले.
पहा व्हिडीओ