मुंबई दि.२१ जून
शिवसेनेचे आमदार सुरतला गेल्या नंतर आता काँग्रेसचे काही आमदार चार ते पाच आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत असून त्यामध्ये तीन विदर्भातले आहेत दोन मराठवाड्यातील आमदार आहेत.
शिवसेनेतील बंडा मुळे काँग्रेस सावध झाली असून ज्या आमदारांचे मोबाईल बंद आहेत त्यांच्या घरातील लॅन्ड लाईन फोन वर संपर्क करण्यात आला मायर ते बंद आहेत पुढच्या काही तासांमध्ये कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आमदारांच्या घरी पाठवण्यात येणार असून विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर काही आमदार मतदारसंघात जात आहे असे सांगून गेले होते मात्र आता ते नॉट रीचेबल झाल्याने काँग्रेसच्या नेत्यांना भीती वाटते की संबंधित आमदार सुरत गेले किंवा भाजपच्या हाती लागले तर नाहीत ना त्या मुळे काँग्रेस गोटातून चिंता व्यक्त होत आहे