HomeUncategorizedजो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तो पर्यत कोणत्याही पक्षाला मतदान नाही...

जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तो पर्यत कोणत्याही पक्षाला मतदान नाही ; येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला मराठा समाजाचे हजारो उमेदवार उभे करणार एसआयटी चौकशी बाबत करोडो मेल केंद्र सरकार राज्य सरकारला पाठवणार ; सकल मराठा समाजाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

advertisement

अहमदनगर – दि.२ मार्च
आज नगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आज कोहिनूर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारा अमोल सुखदेव खुणे यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती समोर शपथ घेण्यात आली यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची असणारी सगे सोयरे बाबत मागणी बाबत कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला

तसेच येणाऱ्या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे समन्वयक यांच्या वतीने देण्यात आली आहे.

मनोज रंगे पाटील हे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या अनेक महिन्यापासून उपोषण करतात मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असून जरांगे पाटलांच्या उपोषणा संदर्भात सरकारने SIT चौकशी करण्याचे ठरवले असल्याने त्या आंदोलनाचा आम्ही देखील भाग असून सरकारने आमची देखील चौकशी करावी या संदर्भात सरकारला मेल करण्यात येणार असल्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे….

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular