दिल्ली १८ जुलै
महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला धक्के बसल्यानंतर आता दिल्लीमध्ये धक्के देण्याची तयारी एकनाथ शिंदे गटाने केली आहे काही खासदार वेगळा गट बनवून शिंदे गट गटाबरोबर जाण्याची चर्चा सुरू असून शिंदे गटाने आज जाहीर केलेल्या नवीन राजकीय कार्यकारणी जाहीर केली त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे भूमिका जाहीर केली आहे.
महाराष्ट्र मध्ये कॉमेडी एक्सप्रेस चा पहिला सीजन झाला तर आता लोकांना भ्रमित करण्यासाठी कॉमेडी एक्सप्रेसचा दुसरा सिझन दिल्लीमध्ये होत असल्याची टीका त्यांनी एकनाथ शिंदे गटावर केली आहे.राजन विचारे हेच सेनेचे मुख्य प्रतोद असून लोकसभेचे गटनेते विनायक राऊत हेच राहतील.फुटीर गट कार्यकारिणीची घोषणा करूच कसा शकतो असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच्या लोकांना भ्रमित करण्यासाठी शिंदे गटाकडून सध्या प्रयत्न सुरू असून शिंदे गटाचे सुथो काही आमदारच आता फुटण्याच्या परिस्थितीत असल्याचं खासदार राऊत यांनी सांगितले आहे .
लोकसभेत शिवसेना ही एक संघ आहे आणि एक संघ राहील असा विश्वासही सुथो त्यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री यांच्यावरच टीका केली आहे . मुख्यमंत्र्यांची शपथ ही कायद्याला धरून नसून 20 तारखेला याचा फैसला होईल आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे असेही त्यांनी सांगितले आहे.