अहिल्यानगर दिनांक 7 जून
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात युद्ध झाले. या हल्ल्याच्या बदला घेत भारताने पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक केला. त्या संपूर्ण ऑपरेशनला सिंदूर असं म्हटलं गेलं. (Moti Pak renamed to Moti Shree) यानंतर भारत- पाकिस्तान बॉर्डरसह अनेक राज्यात तणाव निर्माण झाला. (Moti Shree sweet shop viral news) भारतातील अनेक राज्यात पाकिस्तानाकडून हमले करण्यात आले. इतकेच नाही तर भारताने देखील त्याचे प्रतिउत्तर चोख प्रमाणात दिलं. (Operation Sindoor sweet shop news) अशातच भारतातील काही भागात ‘पाक’ या शब्दांवरुन वाद मोठ्या वाढलेला पाहायला मिळाला. (Traditional Indian sweets renamed)
जयपूरमधील काही नावाजलेल्या मिठाईच्या दुकानातील मिठाईची नावे बदलण्यात आली आहे. ‘मोती पाक’ या मिठाईचे नाव आता ‘मोती श्री’ करण्यात आले. आम पाक, गोंद पाक, मैसूर पाक यांसारख्या काही मिठाईंची नावे बदलण्यात आली. आता ती आम श्री, गोंद श्री, मैसूर श्री नावाने ओळखले जाईल. देशभरात प्रसिद्ध असणारी ही मिठाई आता नव्या नावाने ओळखली जाईल असं म्हटलं जात आहे.
त्याच प्रमाणे अहिल्यानगर मधील दिल्लीगेट परिसरात असलेल्या मधुर मिठाई दुकानातील मैसूरपाक या मधील पाक हा शब्द काढून मैसूर श्री असे नामकरण करण्यात आले आहे.पुरोहित परिवाराने हा निर्णय घेतला असून आज पासून मधुर मिठाई या दुकानात मैसूरपाक नव्हे तर मैसूर श्री असे म्हणून मिठाई खरेदी करावी लागणार आहे.पुरोहित परिवाराने हा निर्णय शुद्धता आणि सांस्कृतिक मूल्यांचा विचार करुन घेतला आहे. ‘पाक’ या शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. यासाठी आमच्या उत्पादनाचे नावही त्याच्या चवीइतकेच शुद्ध आणि भारतीय असायला हवे. म्हणून आम्ही त्याचे नाव पाक श्री’ ठेवण्याचा निर्णय घेतला.